रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत पाच बाद ३५८ धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांत ३५९ धावा करण्याचे आव्हान दिले आहे.





भारताकडून स्टार फलंदाज विराटक कोहलीने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक केले. कोहली व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाडनेही शतक झळकावले. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याने नाबाद ६६ धावा करुन अंतिम टप्प्यात संघाच्या धावा वेगाने वाढतील यावर भर दिला. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वालने २२, रोहित शर्माने १४, विराट कोहलीने १०२, ऋतुराज गायकवाडने १०५, केएल राहुलने नाबाद ६६, वॉशिंग्टन सुंदरने एक, रविंद्र जडेजाने नाबाद २४ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने दोन तर नांद्रे बर्गर आणि लुंगी न्गिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर धावचीत झाला.


ऋतुराज आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. दोघांचे रनिंग बिटवीन द विकेट कौतुकास्पद होते. अधिकाधिक धावा मिळवण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट केले. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांवर दबाव आला आणि भारताची धावसंख्या झपाट्याने वाढली. अखेरच्या टप्प्यात केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने वेगाने धावा वाढवल्या. पण ३७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघाला ५० वे षटक संपेपर्यंत ३५९ धावा एवढीच मजल मारणे शक्य झाले. आता कमी पडलेल्या धावांचा त्रास होऊ नये यासाठी भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्याकडून प्रभावी कामगिरी होणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ