Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार, याबाबतचा निर्णय आज (बुधवार) जाहीर झाला आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हे अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीत चालणार आहे. बैठकीत सर्वानुमते या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कालावधीत राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, वादविवाद आणि महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.



अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या रणनीतीच्या तयारीला वेग येणार आहे. या आठवडाभरात राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


विधिमंडळ सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी कार्यक्रम पत्रिकेत दर्शवलेली प्रश्नोत्तरे शनिवारी १३ डिसेंबर रोजी घेण्यात येतील. तर, १६ डिसेंबरच्या कार्यक्रम पत्रिकेतील प्रश्नोत्तराचा तास १४ डिसेंबरच्या कामकाजात असेल.

Comments
Add Comment

Khopoli News : खोपोलीत दिवसाढवळ्या थरार! नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

खोपोली : खोपोली शहरात आज एका खळबळजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मानसी

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली