धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नऊ दिवसांनी कुटुंबाने हा विधी पार पाडला.


बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेता धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली.


धर्मेंद्र यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे अंतिम संस्कार शांततेत करण्यात आले. यानंतर बुधवार ३ डिसेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करण्यासाठी आणल्या. अस्थींचे गंगेत विसर्जन करून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. सर्व विधी करताना धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलगे म्हणजेच सनी आणि बॉबी उपस्थित होते .


पुजाऱ्यांच्या हस्ते सर्व विधी करण्यात आले, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने विधींसाठी खासगी हॉटेल निवडले होते . अंतिम विधी सगळ्या माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंबाने विशेष काळजी घेतली होती. बुधवारी, सकाळी 11 वाजताच्या कुटुंब हरिद्वारच्या श्रवणनाथ नगर परिसरातील पिलीभीत हाऊस घाटावर पोहोचले आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे गंगेत विसर्जन केले.


कुटुंबाला शांत पद्धतीने त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणालाही न कळता, त्यांनी धर्मेंद्र यांच्या अंतिम विधी केल्या. तसेच घाटाच्या चारीबाजूला सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विसर्जनानंतर देओल परिवार लगेचच मुंबईला येण्यासाठी रवाना झाले .

Comments
Add Comment

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत

लाडकी काव्या म्हणजेच ज्ञानदाची लगीनघाई सुरु; हातावर रंगली त्याच्या नावाची मेहंदी

मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार

दोनच चित्रपटांत १२०० कोटी; आदित्य धरचा थक्क करणारा प्रवास

मुंबई : ‘धुरंधर’ या चित्रपटाने आदित्य धर यांना बॉलीवूडमधील खरा धुरंधर ठरवले आहे. सध्या चर्चेत असलेल्या

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास यांनी ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’द्वारे जागतिक स्टोरीटेलिंगला दिले नवे व्यासपीठ!

बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आणि ज्यांना अनेकदा जगातील महान

कांतारा चॅप्टर १’ ला तगडी टक्कर देत, ‘धुरंधर’ बनला २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

रणवीर सिंग स्टार "धुरंधर" या चित्रपटाने आपली कमाई सुरूच ठेवली आहे.चित्रपटाने १७ दिवसांत ५५५ कोटींचा आकडा ओलांडला