मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक प्रतिमा मोडून सेवा, कर्तव्य आणि जबाबदारी यांना प्राधान्य देणारे नवे मॉडेल आकार घेत आहे. या बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे देशातील प्रमुख सरकारी संस्थांना नवीन, अर्थपूर्ण आणि जनसामान्यांशी जोडणारी नावे देणे. याअंतर्गत पंतप्रधान कार्यालयाला आता ‘सेवा तीर्थ’ असे नवे नाव दिले जात असून, राजभवनांना ‘लोक भवन’ म्हणून पुन्हा ओळख मिळणार आहे. शासनव्यवस्थेत लोकसेवा आणि पारदर्शकतेची नवी भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत प्रशासकीय संकल्पना बदलण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रक्रियेला बळ देत सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमधील नव्या पीएम ऑफिस कॉम्प्लेक्सला सेवा तीर्थ असे नाव देण्यात येत आहे. यामागील मुख्य हेतू सत्ता नव्हे, तर लोकसेवा हीच शासनाची खरी ओळख आहे, हा संदेश दृढ करणे हा आहे.


फक्त प्रशासनिक नव्हे, तर सांस्कृतिक बदल


या उपक्रमांना फक्त नावबदल म्हणून न पाहता, हा शासनातील सांस्कृतिक आणि नैतिक परिवर्तनाचा भाग असल्याचे सरकारचे मत आहे. प्रत्येक इमारत, प्रत्येक प्रतीक आणि प्रत्येक नवे नाव ही एकच कल्पना पुढे नेत आहेत – सरकार हे जनतेची सेवा करण्यासाठीच आहे. याच धर्तीवर राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्यात आले होते.


लोक कल्याण मार्ग, कर्तव्य भवन आणि आता सेवा तीर्थ… ही नावे ‘वेल्फेअर’ आणि ‘ड्यूटी’ या संकल्पनांना अधिक महत्त्व देतात. पीएमच्या अधिकृत निवासस्थानाचा पत्ता २०१६ मध्ये रेसकोर्स रोड ऐवजी लोक कल्याण मार्ग असा करण्यात आला, ज्यातून शासनाच्या लोकाभिमुख दृष्टीकोनाची झलक दिसते.


नव्या नावांचे प्रतीकात्मक महत्त्व


कर्तव्य भवन म्हणून ओळखला जाणारा सेंट्रल सेक्रेटेरिएट हा या तत्त्वज्ञानावर आधारित एक प्रमुख हब बनत आहे. सार्वजनिक सेवा ही एक जबाबदारी आहे, ही भावना या संकल्पनेतून पुढे येते. प्रशासनिक पुनर्रचनेतील हे बदल भारताच्या लोकशाहीला नवी दिशा देत असून, स्टेटसऐवजी सेवा आणि पॉवरऐवजी जबाबदारी यांचा विचार अधोरेखित करत आहेत.

Comments
Add Comment

बडगाम NIA न्यायालयाचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्टची जमीन जप्त

बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या

Bangladesh High Commission Protests Delhi : हिंदूंवरील अत्याचाराचे दिल्लीत तीव्र पडसाद; संतप्त हिंदू संघटनांचा बांगलादेशी उच्चायुक्तालयावर धडक मोर्चा

नवी दिल्ली : शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराचे आणि हिंदू

Digital Fraud News : ८ कोटींची फसवणूक, १२ पानांची चिठ्ठी अन् स्वतःवर गोळी; माजी IPS अमर सिंग चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पटियाला : पंजाबमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून, राज्याचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर

२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी