भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती कारवाई करत आहोत, असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले. त्रिपाठींच्या या वक्तव्याने पाकिस्तानला धडकीच भरली असल्याचे वृत्त आहे.


मे महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतसह कॅरिअर बॅटल ग्रुप आक्रमक स्थितीत सज्ज ठेवला. हे बघून पाकिस्तान घाबरला, त्यांची स्वतःच्या युद्धनौका बाहेर काढण्याची हिंमतच झाली नाही. पाकिस्तानच्या युद्धनौका बंदरातच नांगर टाकून उभ्या राहिल्या. मागील सात महिन्यांपासून भारतीय नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान सतत दबावात आहे; असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.


'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षा आणि नौदलाच्या क्षमतेचा खास उल्लेख केला होता. याबद्दल ॲडमिरल त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी वर्षभरातील नौदलाच्या कामगिरीची माहिती आकडेवारीच्या स्वरुपात जाहीर केली.


५०,००० तास उड्डाण (फ्लाइंग) केले.


५२ समुद्री चाच्यांना (Pirates) पकडले.


समुद्रात ५२० लोकांचे जीव वाचवले.


समुद्रामध्ये ११,००० जहाज-दिवस (ship-days) घालवले.


४३,३०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.


समुद्री चाचेगिरी विरोधी मिशनवर (Anti-Piracy Mission) ४० जहाजे पाठवली.


वेगवेगळ्या मिशनवर १३८ जहाजे तैनात केली.


१३८ युद्धनौकांनी (warships) ७,८०० व्यापारी जहाजांना (merchant vessels) सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत केली.


२००८ पासून आजपर्यंत एडनच्या आखातात (Gulf of Aden) एक जहाज नेहमीच तैनात असते.


लाल समुद्रात (Red Sea) हौथी (Houthi) हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ४० मोठी युद्धनौके तैनात केली, ज्यामुळे ५.६ अब्ज डॉलर (Billion) किमतीचा माल सुरक्षितपणे पार पडला.


ऑपरेशन सागर बंधू (Operation Sagar Bandhu) अंतर्गत श्रीलंकेला INS विक्रांत आणि INS उदयगिरीने १२ टन, तर INS सुकन्याने १०-१२ टन मदत सामग्री पोहोचवली.


गेल्या वर्षीच्या नौदल दिवसापासून (Navy Day) आतापर्यंत आम्ही १ नवीन पाणबुडी (Submarine) १२ नवीन युद्धनौका (Warships) नौदलात सामील केल्या


INS उदयगिरी भारतीय नौदलाची १०० वी युद्धनौका (Warship)


भारताचे प्रत्येक जहाज आणि देशाचा प्रत्येक नौसैनिक हा प्रत्येक क्षणी तयार असतो. ऑपरेशन सिंदूर असो वा लाल समुद्रातील हुती दहशतवाद्यांना धडा शिकवणं असो, समुद्री चाच्यांना पकडणे किंवा श्रीलंकेत मदत पोहचवणं. भारतीय नौदल आज जगातील सर्वात सतर्क, शक्तीशाली आणि मानवीय दृष्टीकोणातून सर्वात चांगल्या नौदलांपैकी एक आहे. पाकिस्तानची झोप उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की आमचा कॅरिअर बॅटल ग्रुप अजूनही अरबी समुद्रात तैनात आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही; असेही भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन