नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर


मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या २ तारखेला मतदान होऊन ३ डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपने प्रचारासाठी या निवडणुकीत आपली टीम उतरवली असून त्यांचा अंतर्गत सर्व्हे देखील आता समोर आला आहे. भाजपने केलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण १७५ नगराध्यक्ष विजयी होतील. महायुतीत आणि निवडणुकांमध्ये भाजपच मोठा भाऊ असणार असल्याचा या सर्व्हेचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात असल्याचं चित्र आहे.


लेटसअप या वेब पोर्टलने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांना विकासकामं आणि भरपूर निधी देण्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात येतंय. भाजप प्रदेशाध्यक्षासह जवळपास सगळेच मंत्री प्रत्येक नगरपालिका आणि नगरपरिषद पिंजून काढत आहेत. त्यातच आता भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला असून या निवडणुकांत भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात भाजपचे एकट्याचे १७५ नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज आहे. राज्यात नगराध्यक्ष पदासाठी २४२ ठिकाणी भाजपचे तर ४६ ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजप सर्वाधिक जागा लढवत असल्यानं भाजपचं राज्यात मोठा भाऊ असेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.


दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही २०० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात एकूण २८० जागांवर निवडणूक होणार आहे. त्यातील २४२ जागा भाजप कमळ चिन्हावर लढवत असून त्यापैकी २०० जागांवर आम्ही विजयी होऊ, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणुकांच्या प्रचाराला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे फिरतोय. त्यामुळे या निवडणुकीत देखील आम्हाला महाराष्ट्र आणि बिहार विधानसभेसारखं यश मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी

राज्य सरकारचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Kiren Rijiju: काँग्रेसच्या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ; भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील

मुंबईच्या धर्तीवर 'ठाणे शहर विकास समिती' स्थापन करा; उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही 'ठाणे शहर