इंधन तुटवड्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावी


मुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल आणि गॅसबाबत काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही कुठेही तुटवडा पडू नये, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरु आहेत. कुणीही अफवा पसरवू नये आणि कुणीही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.


विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अफवांवर विश्वास ठेवून इंधनाचा साठा केल्यास परिस्थिती खराब होईल. त्यातून मागणी आणि पुरवठा ही साखळी तुटेल. त्यामुळे कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, माध्यमांनी पुरावा नसलेल्या गोष्टी दाखवून लोकांमध्ये भीती तयार करू नये. केंद्र सरकार याबाबत उचित काळजी घेत आहे", असेही ते म्हणाले.


काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेले, त्यांना देश कसा चालवला जातो, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत काहीही माहिती नाही. आज मोदीजींनी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. अन्यथा, भारताची काय परिस्थिती असती, हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी टॅरिफ वॉर झाला, तेव्हाही भारत झुकला नाही तर, त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ करार केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांनादेखील मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी असे भाष्य करणे हास्यास्पद आहे", अशी टीका फडणवीसांनी केली.


विरोधकांना तोंड दाखवायला जागा नाही


शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, "आता विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. गिरे तो भी टांग उपर असे विरोधकांचे सुरु आहे. जनता विरोधकांसोबत नाही. महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनतेने विरोधकांना जमीन दाखवली आहे. आम्ही निवडणुका जिंकण्याकरिता नाही तर, निवडणूका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही आंदोलन केले तरी, जनता त्यांच्यासोबत नाही," असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Comments
Add Comment

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Sebastian Sawe : केवळ दोन तासांच्या आत मॅरेथॉनचा विक्रम! सेबॅस्टियन सावेचा ऐतिहासिक पराक्रम

केनियाच्या सेबॅस्टियन सावेने लंडन मॅरेथॉन २०२६ मध्ये इतिहास रचला. त्याने १ तास, ५९ मिनिटे आणि ३० सेकंदात मॅरेथॉन

White House Dinner Firing : व्हाइट हाउसच्या प्रेस सचिवांच्या ‘आज रात्री गोळ्या चालतील’ वक्तव्यानंतर गोळीबार, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाइट हाउस संवाददाता डिनरदरम्यान अचानक गोळीबाराची घटना घडताच मोठा गोंधळ

Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ

मुंबई : पश्चिम आशियातील तणाव संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याच्या

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला