जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम


भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असल्यास त्या ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. बंद व नादुरुस्त जलमापक तात्काळ बदलण्याबाबत ग्राहकांना कळविण्यात आले आहे. त्यानंतरही बहुतांश ग्राहकांनी जलमापक बदललेले नाहीत्य त्यांचा पाणीपुरवठा २४ तासांची नोटीस बजावून खंडित करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या शहरातील सर्व ग्राहकांना बंद असलेले तसेच नादुरुस्त जलमापक यंत्र नव्याने बसविण्याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागा मार्फत सांगण्यात आले आहे.


पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील सर्व मालमत्तांची पाणीपट्टी बील काढण्यासाठी त्या-त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या जलमापकाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. जलमापक यंत्राच्या नोंदी घेत असताना बहुतांश ग्राहकांच्या जलजोडणीस बसविलेले पाण्याचे जलमापक यंत्र बंद, नादुरुस्त असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ज्या आस्थापनांचे वा मालमत्तांचे जलमापक बंद किंवा नादुरुस्त आहेत, अशा ग्राहकांना पालिकेने मे ते ऑगस्ट या काळात पाठविलेल्या पाणीपट्टी बीलात त्यांचे जलमापक सदोष असल्याचे नमूद केले होते. त्यानंतरही सदोष जलमापक बदलले नसल्याचे दिसले.


कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी बंद व नादुरुस्त जलमापक यंत्र तत्काळ बदलून नवीन जलमापक यंत्र बसवावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. जलमापक बदलल्याची माहिती अर्जाद्वारे विभागाला कळविण्यात यावी. त्यामुळे जलमापकातील नोंदीनुसार देयक आकारणे शक्य होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Sahar Shaikh MIM Mumbra : अब कैसे लटकाया...! एक नाही तर ४ शासकीय कार्यालयांना बाप-लेकीनं लावला चुना; पण आता...?

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना

Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि

Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती