पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली. महिलेचा जबडा पाणीपुरी खात असताना सरकला. आता या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे अशक्य झाले आहे. महिलेला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर महिलेला नातलगांनी मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.


दिबियापूरच्या गोरी किशनपूर गावात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षांच्या इकला देवी कामानिमित्त औरैयाला गेल्या होत्या. कामं आटोपल्यावर त्या एका दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या. तिथे एक पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडले, जे बंद करणे कठीण झाले. जबडा सरकल्यामुळे महिलेला वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यामुळे महिला कळवळू लागली. महिलेच्या नातलगांनी तिला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेले. तिथल्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून नातलगांनी महिलेला मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण अद्याप महिलेचा जबडा जागेवर आलेला नाही. महिलेची अवस्था दयनीय झाली आहे. नातलग चिंतेत आहे.


पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ अनेकांना आवडतो. कित्येक महिलांसाठी पाणीपुरी म्हणजे जीव की प्राण. पण ही पाणीपुरी खाण्याचे निमित्त व्हावे आणि जबडा सरकावा असा प्रकार महिलेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडला आहे. या प्रकारामुळे महिला आणि तिचे नातलग धास्तावले आहे. डॉक्टर महिलेचा त्रास कमी व्हावा, तिच्या तब्येतीला आराम पडावा आणि हललेला जबडा जागेवर यावा यासाठी उपचार करत आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court : ....तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय

Supreme Court : जातीय शिवीगाळ प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नेमकी मर्यादा काय आहे,

Prateek Yadav Death : अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे संशयास्पद निधन; लखनौमध्ये खळबळ

लखनौ : उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव

Gold Silver Price Hike : एका झटक्यात बदलले सोन्या-चांदीचे भाव; केंद्र सरकारचा रात्रीत मोठा निर्णय; ग्राहकांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : जर तुम्ही येत्या काही दिवसांत लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी

Monsoon Update : आनंदाची बातमी, अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; कोकणात ६ जूनला आगमनाचा अंदाज

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत दिलासादायक

BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर,

Sanjay Kapoor Property Dispute : 'कपूर संपत्ती प्रकरण महाभारतालाही फिके पाडेल'

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक