पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली. महिलेचा जबडा पाणीपुरी खात असताना सरकला. आता या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे अशक्य झाले आहे. महिलेला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर महिलेला नातलगांनी मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.


दिबियापूरच्या गोरी किशनपूर गावात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षांच्या इकला देवी कामानिमित्त औरैयाला गेल्या होत्या. कामं आटोपल्यावर त्या एका दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या. तिथे एक पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडले, जे बंद करणे कठीण झाले. जबडा सरकल्यामुळे महिलेला वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यामुळे महिला कळवळू लागली. महिलेच्या नातलगांनी तिला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेले. तिथल्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून नातलगांनी महिलेला मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण अद्याप महिलेचा जबडा जागेवर आलेला नाही. महिलेची अवस्था दयनीय झाली आहे. नातलग चिंतेत आहे.


पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ अनेकांना आवडतो. कित्येक महिलांसाठी पाणीपुरी म्हणजे जीव की प्राण. पण ही पाणीपुरी खाण्याचे निमित्त व्हावे आणि जबडा सरकावा असा प्रकार महिलेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडला आहे. या प्रकारामुळे महिला आणि तिचे नातलग धास्तावले आहे. डॉक्टर महिलेचा त्रास कमी व्हावा, तिच्या तब्येतीला आराम पडावा आणि हललेला जबडा जागेवर यावा यासाठी उपचार करत आहेत.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे