मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. प्रतीक्षा भोसले असे मृत विवाहितेचे नाव असून, तिला पहिली मुलगी आहे. मात्र मुलगा हवा म्हणून तिच्यावर सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणात पतीसह चार जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार राजेश्वर वानखेडे यांनी सांगितले की, मुलगी प्रतीक्षाचा विवाह २०२३ मध्ये लक्ष्मण भोसले याच्याशी झाला होता. लग्नावेळी साडेचार लाख रुपये हुंडा दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर पती लक्ष्मण भोसले दारूच्या नशेत प्रतिक्षाला मारहाण करू लागला.नणंद माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख ह्या फोनवरून शिवीगाळ करून प्रतिक्षाल सतावत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.


प्रतिक्षाला पहिली मुलगी झाल्यानंतर छळ आणखी वाढला. मुलगा हवा म्हणून तिच्यावर ओरड, शिवीगाळ आणि पैशांची मागणी केली जात होती. स्कूल व्हॅन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात आला. प्रतीक्षेच्या कुटुंबाने ५० हजार रुपये दिले, परंतु तरीही त्रास थांबला नाही. दरम्यान, प्रतीक्षा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली असताना झालेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तरीही सासरकडच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.


सततच्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर लहान मुलीच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी पती लक्ष्मण शंकरराव भोसले आणि नणंदा माधुरी, दीपाली व भाग्यश्री देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे