Mumbai weather Update : शाल, स्वेटर, जॅकेट्स, बाहेर काढा! मुंबईकरांनो हुडहुडी भरणार, गुड न्यूज वाचा...

मुंबई : उन्हाळा (Summer) असो की पावसाळा, (Monsoon) सतत घामाच्या धारांनी चिंब होणाऱ्या मुंबईकरांना थंडीचा अनुभव मिळणे विरळच असते. परंतु, नोव्हेंबर महिना संपत असतानाच मुंबईकरांना एक अपवादात्मक आणि सुखद गारव्याची अनुभूती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईने १३ वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात थंड सकाळ अनुभवली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान १५.७°C इतके नोंदवले गेले. यापूर्वी नोव्हेंबर २०१२ मध्ये किमान तापमान १४.६°C इतके नोंदवले गेले होते. तापमानात झालेली ही घसरण लक्षणीय आहे. या अपवादात्मक थंडीच्या दिवसाच्या आधी, शनिवारी किमान तापमान २१.८°C होते. म्हणजेच, एकाच दिवसात तापमानात ६.१°C ची मोठी घसरण झाली, ज्यामुळे मुंबईतील हवामानात कमालीचा गारठा पसरला. या सुखद बदलामुळे थंडीचा अनुभव विरळाच असलेल्या मुंबईकरांनी या गारव्याचा पुरेपूर आनंद घेतला.




अवघ्या २४ तासांत पारा ६ अंशांनी घसरला


गेले काही दिवस सरासरीपेक्षा अधिक तापमानामुळे आणि उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबईच्या तापमानात अचानक मोठी घट नोंदवली गेली, ज्यामुळे शहरात थंडीचा कडाका वाढल्याचे अनुभवले गेले. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांनी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १६ अंशांखाली किमान तापमानाची नोंद झाली आहे. ही घट किती मोठी होती, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते, सांताक्रूझ येथे किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. हे तापमान थेट १५.७ अंश सेल्सिअस वर आले. म्हणजेच, अवघ्या २४ तासांत किमान तापमानात ६ अंशांहून अधिक घट झाली. गेल्या काही दिवस मुंबईचे किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात होते आणि दिवसाचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक असल्याने उकाडा सहन करावा लागत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रातही रविवारी २०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तापमानातील या अचानक घसरणीमुळे मुंबईकरांनी सुखद गारव्याचा अनुभव घेतला.



मुंबईकरांसाठी 'डबल गुड न्यूज'


मुंबईतील तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना थंडीचा सुखद अनुभव मिळत असतानाच, त्यांच्यासाठी आणखी एक 'डबल गुड न्यूज' (Double Good News) समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हवेच्या गुणवत्तेत (Air Quality) देखील लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदूषणामुळे मुंबईतील हवा खूप खराब झाली होती आणि अनेकदा हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला होता. मात्र, आज मुंबईचा AQI (Air Quality Index) केवळ १०९ इतका नोंदवला गेला आहे. हा AQI गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत खूप सुधारलेला आहे. AQI १०९ म्हणजे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर सुधारला आहे आणि तो मध्यम (Moderate) श्रेणीत आला आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांचे आरोग्य धोक्याबाहेर आले आहे. तापमान घटल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि याचसोबत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मुंबईकरांना एक चांगला आणि निरोगी दिवस अनुभवता येत आहे.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७