Mumbai weather Update : शाल, स्वेटर, जॅकेट्स, बाहेर काढा! मुंबईकरांनो हुडहुडी भरणार, गुड न्यूज वाचा...

मुंबई : उन्हाळा (Summer) असो की पावसाळा, (Monsoon) सतत घामाच्या धारांनी चिंब होणाऱ्या मुंबईकरांना थंडीचा अनुभव मिळणे विरळच असते. परंतु, नोव्हेंबर महिना संपत असतानाच मुंबईकरांना एक अपवादात्मक आणि सुखद गारव्याची अनुभूती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईने १३ वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात थंड सकाळ अनुभवली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान १५.७°C इतके नोंदवले गेले. यापूर्वी नोव्हेंबर २०१२ मध्ये किमान तापमान १४.६°C इतके नोंदवले गेले होते. तापमानात झालेली ही घसरण लक्षणीय आहे. या अपवादात्मक थंडीच्या दिवसाच्या आधी, शनिवारी किमान तापमान २१.८°C होते. म्हणजेच, एकाच दिवसात तापमानात ६.१°C ची मोठी घसरण झाली, ज्यामुळे मुंबईतील हवामानात कमालीचा गारठा पसरला. या सुखद बदलामुळे थंडीचा अनुभव विरळाच असलेल्या मुंबईकरांनी या गारव्याचा पुरेपूर आनंद घेतला.




अवघ्या २४ तासांत पारा ६ अंशांनी घसरला


गेले काही दिवस सरासरीपेक्षा अधिक तापमानामुळे आणि उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबईच्या तापमानात अचानक मोठी घट नोंदवली गेली, ज्यामुळे शहरात थंडीचा कडाका वाढल्याचे अनुभवले गेले. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांनी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १६ अंशांखाली किमान तापमानाची नोंद झाली आहे. ही घट किती मोठी होती, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते, सांताक्रूझ येथे किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. हे तापमान थेट १५.७ अंश सेल्सिअस वर आले. म्हणजेच, अवघ्या २४ तासांत किमान तापमानात ६ अंशांहून अधिक घट झाली. गेल्या काही दिवस मुंबईचे किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात होते आणि दिवसाचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक असल्याने उकाडा सहन करावा लागत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रातही रविवारी २०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तापमानातील या अचानक घसरणीमुळे मुंबईकरांनी सुखद गारव्याचा अनुभव घेतला.



मुंबईकरांसाठी 'डबल गुड न्यूज'


मुंबईतील तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना थंडीचा सुखद अनुभव मिळत असतानाच, त्यांच्यासाठी आणखी एक 'डबल गुड न्यूज' (Double Good News) समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हवेच्या गुणवत्तेत (Air Quality) देखील लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदूषणामुळे मुंबईतील हवा खूप खराब झाली होती आणि अनेकदा हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला होता. मात्र, आज मुंबईचा AQI (Air Quality Index) केवळ १०९ इतका नोंदवला गेला आहे. हा AQI गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत खूप सुधारलेला आहे. AQI १०९ म्हणजे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर सुधारला आहे आणि तो मध्यम (Moderate) श्रेणीत आला आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांचे आरोग्य धोक्याबाहेर आले आहे. तापमान घटल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि याचसोबत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मुंबईकरांना एक चांगला आणि निरोगी दिवस अनुभवता येत आहे.

Comments
Add Comment

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

Cyber ​​Fraud in Gas Booking : सावधान! गॅस बुकिंगच्या नावाखाली होतोय सायबर फ्रॉड; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपयांचा गंडा

मुंबई : गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना

Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती

मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६

मुंबईत गॅस तुटवडा नाही, महापौरांनी केले 'हे' मुंबईकरांना आवाहन

मुंबई: मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र निर्माण केले जात असून ही अफवा केवळ काँग्रेस आणि

Jannat Zubair Attack: अभिनेत्री जन्नत झुबैरसह भाऊ आयानवर हल्ला, दोघे जखमी; चाहत्यांना धक्का

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैर रहमानी आणि तिचा भाऊ अयान झुबैर रहमानीवर हल्ला

मुंबईच्या विकासाकडे नाही तर दिवा,घड्याळ, साडी, फणी, वेणीकडे लक्ष; महापौरांनी शेलक्या शब्दांत घेतला विरोधी पक्षनेत्यांचा समाचार

मुंबई: महापौरांच्या गाडीवर बसवण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या