देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’!


नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची संख्या वाढून देशावर पेन्शन संकट ओढावणार आहे. ओसीईडीच्या पेन्शन्स ॲट अ ग्लान्स २०२५ अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. भारतातील १०० कामगारांमागे ज्येष्ठांचे प्रमाण २०२४ मध्ये १२.२ टक्के आहे. ते २०५४ मध्ये २७.१ टक्क्यांवर जाईल. वृद्धांच्या संख्येत १२३ टक्क्यांची प्रचंड वाढ होईल.


वृद्ध लोकसंख्या वाढणार असल्याने देशाच्या पेन्शन व आरोग्य व्यवस्थांवर मोठा ताण येणार आहे. निवृत्तीधारकांची संख्या वाढताना कामगार संख्या घटेल. जन्मदर घटणे, आयुर्मर्यादा वाढणे आणि कामगारांचा आकार आक्रसत जाणे यामुळे भविष्यात ही संकटे निर्माण होतील, असे अहवालात म्हटले आहे.


निवृत्तीनंतर भारतीय किती वर्षे जगतात? भारतात पुरुषांना निवृत्तीनंतर सरासरी १६.७ वर्षांचे, तर महिलांना २४.३ वर्षांचे आयुष्य उरते. भारतात महिलांची उरलेली आयुर्मर्यादा ओईसीडी सरासरीपेक्षाही जास्त आहे. अहवालानुसार, भारतात २५-५४ वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या रोजगार दरातील अंतर ५०.७ टक्के आहे, तर ५५-६४ वयोगटात ४४.८ टक्के. हे जगातील सर्वाधिक उच्च अंतर असून, भारतीय महिलांचा रोजगार दर पुरुषांपेक्षा जवळजवळ अर्धा आहे. याचा अर्थ, मुख्य कामाच्या वयातील महिलांना पुरुषांइतक्या रोजगार संधी अजूनही मिळत नाहीत.
वार्षिक कमाईच्या पटीत किती पेन्शन मिळते?


भारतात पेन्शन रक्कमचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भारतात कमाई करणाऱ्या पुरुषांची पेन्शन कमाई ७.९ पट, तर महिलांची ८.३ पट आहे. या तफावतीमुळे भारतातील वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता अत्यंत मर्यादित आहे. मेक्सिको, नेदरलँडमध्ये लोकांना सर्वाधिक पेन्शन कमाई होते.

Comments
Add Comment

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या