देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’!


नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची संख्या वाढून देशावर पेन्शन संकट ओढावणार आहे. ओसीईडीच्या पेन्शन्स ॲट अ ग्लान्स २०२५ अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. भारतातील १०० कामगारांमागे ज्येष्ठांचे प्रमाण २०२४ मध्ये १२.२ टक्के आहे. ते २०५४ मध्ये २७.१ टक्क्यांवर जाईल. वृद्धांच्या संख्येत १२३ टक्क्यांची प्रचंड वाढ होईल.


वृद्ध लोकसंख्या वाढणार असल्याने देशाच्या पेन्शन व आरोग्य व्यवस्थांवर मोठा ताण येणार आहे. निवृत्तीधारकांची संख्या वाढताना कामगार संख्या घटेल. जन्मदर घटणे, आयुर्मर्यादा वाढणे आणि कामगारांचा आकार आक्रसत जाणे यामुळे भविष्यात ही संकटे निर्माण होतील, असे अहवालात म्हटले आहे.


निवृत्तीनंतर भारतीय किती वर्षे जगतात? भारतात पुरुषांना निवृत्तीनंतर सरासरी १६.७ वर्षांचे, तर महिलांना २४.३ वर्षांचे आयुष्य उरते. भारतात महिलांची उरलेली आयुर्मर्यादा ओईसीडी सरासरीपेक्षाही जास्त आहे. अहवालानुसार, भारतात २५-५४ वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या रोजगार दरातील अंतर ५०.७ टक्के आहे, तर ५५-६४ वयोगटात ४४.८ टक्के. हे जगातील सर्वाधिक उच्च अंतर असून, भारतीय महिलांचा रोजगार दर पुरुषांपेक्षा जवळजवळ अर्धा आहे. याचा अर्थ, मुख्य कामाच्या वयातील महिलांना पुरुषांइतक्या रोजगार संधी अजूनही मिळत नाहीत.
वार्षिक कमाईच्या पटीत किती पेन्शन मिळते?


भारतात पेन्शन रक्कमचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भारतात कमाई करणाऱ्या पुरुषांची पेन्शन कमाई ७.९ पट, तर महिलांची ८.३ पट आहे. या तफावतीमुळे भारतातील वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता अत्यंत मर्यादित आहे. मेक्सिको, नेदरलँडमध्ये लोकांना सर्वाधिक पेन्शन कमाई होते.

Comments
Add Comment

Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखू महागणार, अर्थमंत्री सीतारामन आज विधेयक सादर करणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार

चार मिनिटांत ५२ वेळा सॉरी म्हणाला, तरी मुख्याध्यापकांचं दुर्लक्ष

आठवीतल्या मुलाकडून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न मध्य प्रदेश  : रतलाम येथील

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या

जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली  : संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स २०२५' या ताज्या अहवालानुसार, जगात

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी साधला संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या १२८ व्या

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना खुशखबर! एलपीजी सिलेंडरच्या दरात घट, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच एक आनंदाची बातमी आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी