देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’!


नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची संख्या वाढून देशावर पेन्शन संकट ओढावणार आहे. ओसीईडीच्या पेन्शन्स ॲट अ ग्लान्स २०२५ अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. भारतातील १०० कामगारांमागे ज्येष्ठांचे प्रमाण २०२४ मध्ये १२.२ टक्के आहे. ते २०५४ मध्ये २७.१ टक्क्यांवर जाईल. वृद्धांच्या संख्येत १२३ टक्क्यांची प्रचंड वाढ होईल.


वृद्ध लोकसंख्या वाढणार असल्याने देशाच्या पेन्शन व आरोग्य व्यवस्थांवर मोठा ताण येणार आहे. निवृत्तीधारकांची संख्या वाढताना कामगार संख्या घटेल. जन्मदर घटणे, आयुर्मर्यादा वाढणे आणि कामगारांचा आकार आक्रसत जाणे यामुळे भविष्यात ही संकटे निर्माण होतील, असे अहवालात म्हटले आहे.


निवृत्तीनंतर भारतीय किती वर्षे जगतात? भारतात पुरुषांना निवृत्तीनंतर सरासरी १६.७ वर्षांचे, तर महिलांना २४.३ वर्षांचे आयुष्य उरते. भारतात महिलांची उरलेली आयुर्मर्यादा ओईसीडी सरासरीपेक्षाही जास्त आहे. अहवालानुसार, भारतात २५-५४ वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या रोजगार दरातील अंतर ५०.७ टक्के आहे, तर ५५-६४ वयोगटात ४४.८ टक्के. हे जगातील सर्वाधिक उच्च अंतर असून, भारतीय महिलांचा रोजगार दर पुरुषांपेक्षा जवळजवळ अर्धा आहे. याचा अर्थ, मुख्य कामाच्या वयातील महिलांना पुरुषांइतक्या रोजगार संधी अजूनही मिळत नाहीत.
वार्षिक कमाईच्या पटीत किती पेन्शन मिळते?


भारतात पेन्शन रक्कमचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भारतात कमाई करणाऱ्या पुरुषांची पेन्शन कमाई ७.९ पट, तर महिलांची ८.३ पट आहे. या तफावतीमुळे भारतातील वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता अत्यंत मर्यादित आहे. मेक्सिको, नेदरलँडमध्ये लोकांना सर्वाधिक पेन्शन कमाई होते.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.