ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच संपणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'? नव्या मालिकेची घोषणा अन् वेळही तीच!

मुंबई : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर कथा मोठ्या वळणावर आली होती. तिच्या ‘कला’ या पात्राचा अपघाती मृत्यू दाखवल्यानंतर मालिकेत नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली. मात्र कला-अद्वैत या जोडीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का ठरला आणि त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. आता या मालिकेच्या चाहत्यांवर आणखी एक धक्का येऊ शकतो, कारण अवघ्या काही दिवसांत नवीन मालिका सुरू होत असून तिला ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा टाइम स्लॉट देण्यात आला आहे.


सध्या ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते. मात्र पुढील महिन्यापासून या वेळेत ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका दाखवली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून ही नवी मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी तिचा प्रोमो सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ कायमस्वरूपी बंद होणार का किंवा मालिकेची वेळ बदलली जाणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


दरम्यान ‘वचन दिले तू मला’ या नव्या मालिकेत ‘ऊर्जा’ आणि ‘शौर्य’ यांची जोडी दिसणार आहे. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत असून अभिनेते मिलिंद गवळी या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतील. न्यायासाठी लढणाऱ्या ऊर्जाच्या संघर्षाची कोर्टरूम ड्रामा शैलीतील ही कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.


ईशा केसकरने मालिका का सोडली?


ईशाने मालिकेतून बाहेर पडण्याचे कारण तब्येतीचे असल्याचे स्पष्ट केले. सलग दोन वर्षे काम करत असताना तिच्या डोळ्याला फोड आला होता, तरीही ती शूटिंग करत होती. मात्र दुखापत वाढल्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे सांगण्यात आले. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच तिने टीमला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi : राकेश बापटने तन्वीला केलं किस; राखी सावंत भडकली आणि ....

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची

Rashmika Vijay Wedding रश्मिकाला मंगळसूत्र घालताना थरथरले विजयचे हात, म्हणाला, "तिला काहीच वाटत नव्हतं, पण मी मात्र

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी, म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय

Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र

मुंबई : ' बिग बॉस मराठी ६ 'च्या २६ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कॅप्टन्सी टास्क घेतात. पहिल्या फेरीत विशाल

पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा

शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला