ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच संपणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'? नव्या मालिकेची घोषणा अन् वेळही तीच!

मुंबई : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर कथा मोठ्या वळणावर आली होती. तिच्या ‘कला’ या पात्राचा अपघाती मृत्यू दाखवल्यानंतर मालिकेत नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली. मात्र कला-अद्वैत या जोडीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का ठरला आणि त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. आता या मालिकेच्या चाहत्यांवर आणखी एक धक्का येऊ शकतो, कारण अवघ्या काही दिवसांत नवीन मालिका सुरू होत असून तिला ‘लक्ष्मीच्या पावलांनी’चा टाइम स्लॉट देण्यात आला आहे.


सध्या ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते. मात्र पुढील महिन्यापासून या वेळेत ‘वचन दिले तू मला’ ही नवी मालिका दाखवली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून ही नवी मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी तिचा प्रोमो सुद्धा रिलीज झाला. त्यामुळे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ कायमस्वरूपी बंद होणार का किंवा मालिकेची वेळ बदलली जाणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


दरम्यान ‘वचन दिले तू मला’ या नव्या मालिकेत ‘ऊर्जा’ आणि ‘शौर्य’ यांची जोडी दिसणार आहे. अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत असून अभिनेते मिलिंद गवळी या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतील. न्यायासाठी लढणाऱ्या ऊर्जाच्या संघर्षाची कोर्टरूम ड्रामा शैलीतील ही कथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.


ईशा केसकरने मालिका का सोडली?


ईशाने मालिकेतून बाहेर पडण्याचे कारण तब्येतीचे असल्याचे स्पष्ट केले. सलग दोन वर्षे काम करत असताना तिच्या डोळ्याला फोड आला होता, तरीही ती शूटिंग करत होती. मात्र दुखापत वाढल्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे सांगण्यात आले. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्येच तिने टीमला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय