अधिवेशनातील निर्णयांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार

राज्य सरकारची नवी नियमावली जारी


मुंबई : अधिवेशन काळात मुख्यमंत्री व मंत्र्यांकडून कुठलाही मुद्दा उपस्थित केला जातो. तसेच सभागृहाच्या पटलावर निवेदन व माहिती सादर केली जाते. मुख्यमंत्री व मंत्र्यांकडून बैठकीचे आश्वासन दिले जाते. अशा वेळी मंत्रालयातील संबंधित विभागातील अधिकारी यांनी आदेशाची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. याबाबत शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व विभागांना कठोर सूचना जारी केल्या असून, अधिवेशनातील कामकाज अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघुले यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.


शासन परिपत्रकानुसार, विभागांनी तारांकित आणि अतारांकित प्रश्नांची उत्तरे क्यूआयएस प्रणालीद्वारे वेळेत व परिपूर्ण स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. खुलाशासाठी पाठविलेल्या सूचनांची माहिती तीन दिवसांत विधानमंडळ सचिवालयाकडे पाठवणे आवश्यक असून, अधिवेशनादरम्यान आलेल्या लक्षवेधी सूचनांवरील निवेदने अधिवेशन संपण्यापूर्वी अनिवार्यपणे सादर करावीत. सरकारी विधेयकांवरील चर्चेसाठी मंत्री आणि राज्यमंत्री यांनी समाधानकारक उत्तरे देणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक विधेयकासंबंधी स्वयंस्पष्ट टिप्पणी सचिवांकडून तयार करून मुख्यमंत्री कार्यालयास पाठवावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध