धक्कादायक! पुण्यात 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या तरुणाचे टोकाचे पाऊल, अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे: 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर पवार असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा मुळचा बुलढाण्याचा रहिवासी असून पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी तो आला होता. सागरने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही आहे. मात्र परिक्षेच्या ताणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद करून घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,सागर पवार स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी बुलढाण्याहून पुण्यात आला होता. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर पुण्यात ज्या ठिकाणी राहत होता तो रूम आतून लॉक असल्यामुळे पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. यावेळी सागर पवार मृत अवस्थेत दिसून आला.




यानंतर पोलिसांनी घटनास्थळी काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी संपूर्ण रुमचा तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. कोणतीच चिठ्ठी किंवा निशाणी सोडून गेल्याचा कोणताच पुरावा सागरने मागे सोडला नाही आहे. यामुळे तपास करताना पोलिसांना प्राथमिक अंदाजे वर्तवणे सुद्धा कठीण जात आहे. दरम्यान या घटनेत आता सागर पवारचे कुटुंबियांसोबतचे संभाषण आणि मोबाईलची तपासणी यावरून तपास करण्यात मदत होणार आहे. यामुळे कदाचित त्याच्या आत्महत्या मागचे कारण समजणार आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे