एमएमसीचा प्रवक्ता विकास नागपुरे उर्फ ​​अनंत आणि ११ नक्षलवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण, नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

गोंदिया: महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून नक्षल संघटनेमधून आत्मसमर्पणाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नक्षलवादी संघटनेच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) चा विशेष विभागीय समिती सदस्य आणि प्रवक्ता विकास नागपुरे ऊर्फ अनंतसह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) गोंदिया पोलिसांसमोर या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र शासनाचे एकूण ८९ लाख रुपयांचे बक्षीस होते.


महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ अर्थात 'एमएमसी' या नक्षलवादी संघटनेचा प्रवक्ता अनंतने २७ नोव्हेंबरला प्रसिद्धी पत्रक जारी करत १ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण समिती आत्मसमर्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी अनंतसह ११ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शरणागती पत्करली. नक्षलवादाविरोधात हे खूप मोठे यश मानावे लागेल.


प्रसिद्धी पत्रकात अनंत याने सांगितले की, समितीतील इतर सदस्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी १ जानेवारी २०२६ पर्यंत वेळ हवा आहे. भूपती आणि चंद्रन्ना यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याने आत्मसमर्पणाशिवाय पर्याय शिल्लक नाही. १ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शस्त्रे खाली ठेवण्यात येतील. तसेच, या काळात कोणतीही हिंसा किंवा पीएलजीए सप्ताह पाळला जाणार नाही, असे आश्वासनही त्याने दिले.


नक्षलवादी संघटनेत दंडकारण्य आणि एमएमसी समितीचे मोठे महत्त्व आहे. एमएमसीमधील भूपती आणि चंद्रन्ना या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्यामुळे हळूहळू सर्वजण आत्मसमर्पणाकडे वळले आहे. त्यात ११ माओवाद्यांचे एकत्रिक आत्मसमर्पण आणि अनंतने सांगितलेले संपूर्ण एमएमसी संघटनेची लवकरच होणारी शरणागती हे नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.


Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय