वायुप्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी उपाययोजनांची सक्ती अनिवार्य

मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश


एक्यूआय सुधारण्यापर्यंत नागरिकांना रेल्वे स्थानक, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क देण्याबाबत सूचना


मुंबई : शहरातील दिवसेंदिवस वाढते वायुप्रदूषण कमी करण्यासाठी व हवेचा दर्जा सुधारण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) उदासीन असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील सर्व बांधकाम साइट्सवर प्रदूषण दर्शक यंत्रणा, धूळ बाहेर उडू नये यासाठी उंच पत्रे उभारणे केवळ बंधनकारक करून उपयोग नाही. तर त्यांची अंमलबजावणी होतेय की नाही?, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत यासाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश देत न्यायालयाने सुनावणी १५ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. एक्यूआय सुधारेपर्यंत लोकांना रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे व इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क देण्याबाबत विचार करावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.


या समितीत अमायकस क्युरींच्या कार्यालयातील व्यक्तींसह मुंबई महापालिका, एमपीसीबी आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील एका व्यक्तीचा समावेश असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ही समिती सर्वात खराब एअर क्वालिटी इंडेस्क असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करेल. त्या ठिकाणी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होतेय की नाही, याची चाचपणी करून पुढील सुनावणीत आपला अहवाल सादर करेल, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशातून स्पष्ट केले आहे. मुंबई शहर व उपनगरात वाढत्या प्रदूषणामुळे आजारी पडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.


बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मापन यंत्रणा


मुंबईतील हवेचा दर्जा प्रदूषणामुळे घसरला असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली.


नियमांची कठोर अंमलबजावणी आवश्यक


बांधकामाच्या ठिकाणी घालून दिलेल्या नियमांची संबंधितांनी पूर्तात न केल्यास ते बांधकाम थांबवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, ही कारवाई करताना आर्थिक नुकसानीच्या मुद्द्याचाही विचार केला पाहिजे, असे मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले. यासाठी सर्व बांधकामांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे, असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्याच सुनावणीत दिले होते.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध