विवाहादरम्यान सहा लाखांचे दागिने चोरीला

पुणे (प्रतिनिधी) : बाणेर येथील मंगल कार्यालयात विवाहादरम्यान चोरट्यांनी दागिन्यांची पिशवी चोरून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ २५ नोव्हेंबर रोजी बाणेर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांनी एका टेबलवर गडबडीत दागिन्यांची पिशवी ठेवली. पिशवीत सोन्याचे दागिने, एक लाख ३० हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज होता. चोरट्यांनी संधी साधून पिशवी चोरली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत. दरम्यान, विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर परिसरातही अशीच घटना घडली होती.
Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे

धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर, तरुणानं संतापाच्या भरात प्रेयसीसह तिच्या आईला संपवलं

Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाने