वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील २९ प्रभागात सुमारे ५२ हजार ३७८ इतक्या मतदारांची नावे मतदार यादीत दुबार आहेत. त्यामुळे या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून हमी पत्र लिहून घेण्याकरिता पालिका प्रशासनाने पथकांची निर्मिती केली आहे.


महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग आहेत. २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणुकीची आरक्षण सोडत प्रक्रिया ११ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर प्रभागातील प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या पालिकेने २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या आहेत. संपूर्ण पालिका क्षेत्रात एकूण ११ लाख २७ हजार ६४० इतक्या मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशभरात दुबार मतदार यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.


वसई-विरार महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार याद्यामध्ये विविध प्रभागात ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार आहेत. त्यामुळे दुबार नावं असलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी पालिकेने प्रभाग निहाय पथके नियुक्त केली आहे. नऊ प्रभागात नऊ पथके असून एका पथकात सहा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार आहे.याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


एकूण मतदार - ११,२७,६३७
एकूण पुरुष मतदार -  ६,०१,७४१
एकूण महिला मतदार -  ५,२५,७५०
एकूण इतर मतदार -  १४६


हरकती नोंदविण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
राज्यातील २९ पालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी असलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर होती; परंतु निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात सुधारणा केली आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार, दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख १० डिसेंबर करण्यात आली आहे. तसेच, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २२ डिसेंबर असणार आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक