'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई - पुणे प्रवास होणार सुलभ


मुंबई  : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग लोणावळा-खंडाळा विभागातील टायगर व्हॅलीजवळ उभारण्यात आला आहे. हा ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आता जवळपास पूर्णत्वास आला आहे. जमिनीपासून सुमारे १०० मीटर उंचीवर असलेल्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचे उद्घाटन मे २०२६ मध्ये होणार असून हा मार्ग सुरू झाल्यावर मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास आणखी सुलभ होणार आहे.


या प्रकल्पाचे ९६ टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे; परंतु केबल-स्टेड पूल हा तांत्रिकदृष्ट्या सर्वात कठीण भाग आहे. वाऱ्याचा वेग, मुसळधार पाऊस आणि दरीची खोली यामुळे त्याचे काम मंदावले आहे. या कठीण परिस्थितीमुळे अभियंत्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. लोणावळा-खंडाळा घाटांच्या खडकाळ भूप्रदेशातून बाहेर पडून हा प्रकल्प आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. टायगर व्हॅली येथील ६५० मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाचा डेक जवळजवळ पूर्ण झाला आहे. पावसाळ्यानंतरच्या बांधकामाला वेग आला असून डेकचा फक्त शेवटचा भाग जोडणीच्या प्रतीक्षेत आहे. हवामान आणि भूप्रदेशाची परिस्थिती अनुकूल राहिल्यास पुढील चार महिन्यांत हा शेवटचा तुकडा जोडण्याचे पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.


मुंबई - पुणे प्रवास ३० मिनिटांत


जुन्या अपघात-प्रवण घाट मार्गाला बायपास करण्यासाठी डिझाइन केलेला १३.३ किमी लांबीचा हा आठ-लेनचा प्रवेश-नियंत्रित कॉरिडॉर आहे. कार्यान्वित झाल्यानंतर तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे ३० मिनिटांनी कमी करेल आणि प्रवास जवळजवळ सहा किलोमीटरने कमी करेल अशी अपेक्षा आहे. १२० किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन केलेला मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात असून तो सुरू कधी होणार याबाबत आता प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.


घाटाचा रस्ता टाळता येणार
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर या द्रुतगती मार्गावरील घाटाचा रस्ता टाळता येणार आहे. यामुळे येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून देखील प्रवाशांची सुटका होणार आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंग दोन्ही महानगरांमधील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

Comments
Add Comment

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण

रस्त्यावर थुंकल्यास, कचरा टाकल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ

महापालिकेने नव्याने स्वच्छता उपविधी तयार दंडाची रक्कमेची आकारणी २ फेब्रुवारीपासून अमलात मुंबई : मुंबई

मेट्रो- ४ मार्गिकेच्या कामाला गती

भांडुप येथे ३२५ मेट्रिक टनचे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून