Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत. राज्याच्या प्रशासनातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून त्यांची मुख्य सचिव या पदावर निवड झाली आहे. राजेश अगरवाल यांचा कार्यकाळ पंधरा महिन्यांचा असेल. यामुळे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ओ. पी. गुप्ता आणि दीपक कपूर या चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची संधी हुकल्याची चर्चा आहे.


राजेश अगरवाल हे महाराष्ट्र कॅडरचे १९८९च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून कॉम्प्युटर सायन्समधून बी टेक ही पदवी घेतली आहे. त्यांनी अकोला आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त, महाराष्ट्र वित्त आणि आयटी विभागांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, केंद्रात आधार, जनधन, डिजीलॉकर आणि सामाजिक न्याय उपक्रमांवर काम केले आहे. राजेश अगरवाल यांनी केंद्रात अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागात सचिव म्हणून काम केले आहे. डिजिटल प्रशासन कौशल्य, प्रशासकीय कौशल्य आणि सुधारणा-केंद्रित नेतृत्वासाठी ओळखले जाणारे राजेश अगरवाल हे १ डिसेंबर २०२५ पासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.


राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची जून २०२५ मध्ये राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी राजेश अगरवाल हे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.