गोव्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७७ फुटी रामाच्या मूर्तीचे अनावरण

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात रामाच्या जगातील सर्वात उंच ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले . श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या आवारात ही मूर्ती उभारण्यात आली आहे. मठाला ५५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रामाची जगातली सर्वात उंच मूर्ती उभारण्यात आली आहे.


पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. याआधी शिल्पकार राम सुतार यांनीच गुजरातमधील "स्टॅच्यू ऑफ युनिटी" अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातली सर्वात उंच मूर्ती उभारली आहे.


मठाला ५५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने दररोज मठात दहा हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत. दक्षिण गोव्यातील कॅनाकोना येथील परतागल गावात असलेल्या मठाचे सध्याचे संकुल सुमारे ३७० वर्षांपूर्वी बांधले आहे.


गोव्याला जाण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील उडुपी येथे रोड शो केला. तिथे त्यांनी श्रीकृष्ण मठात "लक्ष कंठ गीता पारायण" कार्यक्रमात भाग घेतला . या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी विद्यार्थी, संत, विद्वान आणि विविध क्षेत्रातील लोकांसह एक लाखांपेक्षा जास्त लोकांसह भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण केले.उडुपीमध्ये पंतप्रधानांनी सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन केले आणि कनकदासाशी संबंधित पवित्र स्थान 'कनकण किडी' साठी सोन्याच्या आवरणाचे उद्घाटन केले.


कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी उडुपीमध्ये जनसंघ आणि नंतर भाजपच्या सुशासन मॉडेलची आठवण करून दिली. ते म्हणाले की, १९६८ मध्ये व्हीएस आचार्य उडुपी महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर येथे स्वच्छता आणि ड्रेनेज व्यवस्थेचे एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले.


पंतप्रधान म्हणाले की, आज जेव्हा जगाने एक लाख लोकांना गीतेतील श्लोकांचे एकत्र पठण करताना पाहिले, तेव्हा भारताची आध्यात्मिक शक्ती जगासमोर प्रकट झाली.


Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार