महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत आहे. यासाठीच राज्यात स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याकरिता बारामतीसह काटोल, चांदुरबाजार, कळमनुरी आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील ७५ गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या गावांमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षणासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण ७५ गावांमध्ये या प्रकल्पाचा प्रायोगिक तत्त्वावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. बारामती आणि काटोल तालुक्यातील प्रत्येकी दहा गावांमध्ये तसेच कळमनुरी तालुक्यातील अकरा गावांमध्ये, चांदुरबाजार तालुक्यातील २३ तर वैभववाडी तालुक्यातील २१ गावांमध्ये प्रकल्प राबवला जाणार आहे.


नागपूरमधील मौजे सातनवरी या गावी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला होता. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १० गावे या प्रकल्पांतर्गत समाविष्ट करून स्मार्ट व इंटेलिजंट व्हिलेज उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार, राज्यात सर्व जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये हा प्रकल्पात अंमलात येणार आहे.


प्रकल्पातून संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही देखरेख, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण इत्यादी विभागांच्या ऑनलाइन सेवा व ई-प्रकल्प, स्मार्ट कृषि सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा स्मार्ट सेवा टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, प्रकल्पातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाणार असून सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय

Navnath Ban : "हे ऐतिहासिक पर्व नाही, तर पराभवाची नांदी!"; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला, मुंबई लुटणाऱ्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या संभाव्य युतीवर राजकीय