विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११ वर्षीय सार्थक मोरे या मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पालिकेचा सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे


ही घटना विरारच्या फुलपाडा परिसरातील खाडग्या तलावात घडली. सार्थक खेळण्यासाठी तलावाजवळ गेला असताना त्याचा पाय घसरून तो थेट पाण्यात पडला. मात्र तलावाजवळ ना सुरक्षारक्षक, ना जीवरक्षक… त्यामुळे वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू असून, ठेकेदाराकडून नवीन जाळी बसवण्याचे काम सुरू होते. पण प्रत्यक्षात परिसरात ना जाळी पूर्ण, ना बॅरिकेड, ना सूचना फलक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता. या गंभीर निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.रहिवाश्यांनी थेट आरोप केला आहे की, पालिका आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळेच एका निरागस मुलाचा जीव गेला. तलावावर कोणतेही नियंत्रण अथवा देखरेख नसल्याने मुलांना निर्बंधाशिवाय जागेवर फिरता येत होते, असेही नागरिकांनी सांगितले.


वसई-विरार भागातील तलावांमध्ये गेल्या काही महिन्यांत बुडून मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. तरीही महापालिकेकडून ठोस सुरक्षा उपाययोजना होत नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची