झुबीन गर्गची 'हत्या'च! आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधानसभेत धक्कादायक वक्तव्य

गुवाहाटी: आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नसून त्याची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. आसाम राज्यातील विरोधी पक्षाने झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना मंगळवारी (२५ नोव्हेंबर) आसामच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले. तपासकर्त्यांच्या हाती नवे पुरावे लागले असल्याचे ही यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.


मुख्यमंत्री सरमा म्हणाले, झुबेनचा मृत्यू हा 'गुन्हेगारी कट' किंवा 'गुन्हेगारी हत्या' नव्हती. तर ती 'स्पष्ट हत्या' होती. राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक जुबिनच्या मृत्यूची चौकशी करत आहे. जुबिन गर्गच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने चालला आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही, मात्र या प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांना शिक्षा केली जाईल. आम्ही सरकार म्हणून कुणाचाही बचाव करणार नाही.




नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी झुबीन गर्ग सिंगापूरला गेला होता. फेस्टिव्हल दरम्यान १९ सप्टेंबर रोजी समुद्रात पोहताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, झुबीनचा चुलत भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग आणि त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नंदेश्वर बोरा आणि प्रबीण वैश्य यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.


जुबिन गर्ग याच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या एक सदस्यीय आयोगाने जबाब नोंदवण्याची आणि पुरावे सादर करण्याची अंतिम मुदत १२ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने ३ नोव्हेंबरपासून घटनेसंदर्भात जबाब नोंदवण्यास आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी