शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या घटनेदरम्यान अनेक प्रदेश तब्बल ६ मिनिटे २३ सेकंद गडद अंधारात बुडणार आहेत. २१ व्या शतकात एवढा मोठं सूर्यग्रहण यापूर्वी कधीही दिसलं नव्हतं, त्यामुळे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाशप्रेमींना ही पर्वणीच आहे.


खगोलशास्त्रज्ञांनी या सूर्यग्रहणाची तयारी सुरू केली असून, इतक्या मोठ्या कालावधीत होणारे खग्रास सूर्यग्रहण अवकाशशास्त्रीय संशोधनासाठीही महत्त्वाचं असेल. सहसा खग्रास सूर्यग्रहण 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ टिकतं, मात्र २०२७ मध्ये होणारे ग्रहण जवळपास दुपटीहून अधिक काळ टिकणार असल्याने ते विशेष ठरणार आहे.


खगोलीय दृष्टीनेही ही घटना विलक्षण आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूरच्या ठिकाणी असेल, त्यामुळे सूर्याचा आकार आकाशात लहान दिसेल. त्याचवेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असेल, त्यामुळे तो नेहमीपेक्षा मोठा वाटेल आणि सूर्य पूर्णपणे झाकू शकेल. या दुर्मिळ संयोगामुळे सूर्यप्रकाश अडवला जाऊन दीर्घकाळ अंधार निर्माण होणार आहे.


सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे जी अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या रेषेमुळे उद्भवते. या काळात सूर्यासमोर असलेल्या चंद्राच्या आकारामुळे त्याच्या प्रकाशात अडथळा निर्माण होतो, परिणामी पृथ्वीवर अंधार पडतो. २ ऑगस्ट २०२७ रोजी पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असेल. त्यामुळे आकाशात सूर्य लहान दिसेल. परंतु त्याच वेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल आणि त्याच्या कक्षीय मार्गावर फिरत असेल, ज्यामुळे तो आकाराने मोठा दिसेल. हे दुर्मिळ संयोजन जास्त काळ सूर्यप्रकाश रोखू शकेल, ज्यामुळे हे ग्रहण जास्त काळ होईल.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने