Nashik News : नाशिक हादरले! ओझरच्या चंपाषष्टी उत्सवात बारागाड्यांच्या चाकाखाली चिरडून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ओझर गावातून (Ozar, Nashik) एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अशा चंपाषष्टी उत्सवात (Champashashti Utsav) जुन्या परंपरेनुसार बारागाड्या ओढत असताना, बारागाड्यांच्या चाकाखाली येऊन एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी चंपाषष्टीच्या निमित्ताने ओझर गावात बारागाड्या ओढण्याची जुनी परंपरा उत्साहात सुरू होती. हा रोमांचक उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच उत्साहात किरण कर्डक नावाचा तरुण भाविक सहभागी झाला होता.



यात्रा सुरू असताना अचानक मोठी गर्दी उसळली आणि याच गडबडीत बारागाड्या ओढत असताना किरण कर्डक हा बारागाड्यांच्या चाकाखाली आला. बारागाड्यांच्या खाली चिरडल्याने या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. उत्सवाच्या उत्साहादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे या पारंपरिक उत्सवातील सुरक्षिततेच्या नियमांवर आणि गर्दीच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे