भारतीय क्रिकेटपटू पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या! बलात्काराचा आरोप अन् एका वर्षात जीवन संपवले, जाणून घ्या सविस्तर

राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे. पुजाराचा मेहुणा जीत रसिखभाई पाबरीवर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास सुरू झाला आहे. एका तरुणीने जीत विरोधात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होताच जीतने आत्महत्या केली असल्याने त्याच्या आत्महत्येसाठीचे प्राथमिक कारण हेच सांगितले जात आहे. लग्नाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीमध्ये केला होता. यामुळे तणावाखाली आलेल्या जीतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


जीत पाबरी विरोधात एका तरुणीने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मालवीय नगर पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तरुणीसोबत जीतचा साखरपुडा झाला होता. पण पुढे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने त्यांनी नातेसंबंध तोडून टाकले. त्यानंतर तरुणीने जीत विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. लग्नाचे आश्वासन देऊन साखरपुडा झाल्यावर जीतने अनेकदा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतर लग्न मोडले, असे गंभीर आरोप तरुणीने केले. या प्रकरणामुळे जीत विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर वर्षभरातच जीतने आत्महत्या करत जीवन संपवले. यावेळी चेतेश्वर पुजारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात समालोचन करत होता.




मिळालेल्या माहितीनुसार, जीत गेल्या वर्षभरापासून कायदेशीर खटल्याचा सामना करत होता. यामुळे तो बराच ताणतणावात होता. पण आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे,असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.चेतेश्वर पुजारा यांची सासरवाडी जामजोधपूरमध्ये आहे. पण त्याच्या सासरचे लोक गेल्या २० वर्षांपासून राजकोटमध्येच वास्तव्यास असून ते कॉटन जिनिंग फॅक्ट्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचा एक कारखाना आहे.

Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'