कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी संघर्ष, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष मठांपर्यंत पोहोचला

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष आता राज्यातील मठांपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी सुरू झालेला हा संघर्ष हळू हळू तीव्र होऊ लागला आहे. या संघर्षामुळे काँग्रेसचे कर्नाटकमधील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेही स्वतःचा गट मबजूत करण्यासाठी तसेच प्रतिस्पर्धी गटाला कमकुवत करण्यासाठी शह काटशहचे राजकारण करू लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिस्पर्धी आमदारांना स्वतःच्या गटात ओढण्यासाठी ५० कोटी रुपये, फ्लॅट, लक्झरी कार अशा स्वरुपाची आमिषं दिली जात आहेत.


मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्षात आता वोक्कालिगा समाजाचा आदिचुंचनगिरी मठ ओढला गेला आहे. आदिचुंचनगिरी मठाचे प्रमुख निर्मलानंद नाथ स्वामी यांनी जाहीररित्या डी. के. शिवकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी दलित आणि ओबीसी नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेवेळी सिद्धरामय्या अडीच वर्ष मुख्यमंत्री राहतील नंतर हे पद डी. के. शिवकुमार यांना दिले जाईल, असा तोंडी करार झाला होता. पण अडीच वर्ष उलटली तरी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडलेले नाही. यामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ओबीसी गटातील कुरुबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वोक्कालिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राजकीय संघर्ष वाढला तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मतपेढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर कर्नाटकचा राजकीय पेच सोडवण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन