येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजनल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात अर्ध्या मुंबईत १५ टक्के कपात लागू राहणार आहे.


तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकण्याची काही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्के घट होणार आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली जाणार आहे. बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरूवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू राहणार आहे. या कालावधीत कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा,असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण.... - 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन