राणीबागेतील 'शक्ती' वाघाचा संशयास्पद मृत्यू! आठ दिवसांनंतर व्यवस्थापनाने केले उघड, का केली लपवाछपवी?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी घोषिक करण्यात आले. खरंतर या वाघाचा मृत्यू १७ नोव्हेंबर रोजी झाला होता. परंतू आज सकाळी तब्बल आठ दिवसांनंतर मृत्यूबाबत सांगण्यात आले आहे. यामुळे वाघाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून प्राणीसंग्रहालाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघ २०२०मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलेला होता. जेव्हा या वाघाला संग्रहालयात आणले गेले तेव्हा तो अवघ्या साडेतीन वर्षांचा असून आता त्याचे वय १० वर्ष होते. या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती मिळली आहे. मात्र उद्यान व्यवस्थापनाकडून वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस का लपवली गेली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


शक्ती वाघाला राहण्यासाठी प्रशासनाने उद्यानात नैसर्गिक अधिवास केला होता. वाघाला खाण्यासाठी मांसाहार आणि मुबलक पाणी असायचे. तसेच बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी ठिक-ठिक ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोबत 'जय' नावाचा दुसरा वाघ आणि करिश्मा वाघीण एकत्र राहत होते. परंतू १७ नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.




भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी दावा केला आहे की, शक्ती वाघाचा मृत्यू मांस खाताना हाड श्वसननलिकेत अडकल्यामुळे झालेला आहे. तसेच ज्या वेळेस वाघाचा मृत्यू झाला त्याची माहिती कायद्यानुसार महाराष्ट्र झू अथोरिटी आणि सेंट्रल झू अथोरिटीला सविस्तर सांगणे आवश्यक होते, मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती. यामुळे संग्रहालय व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे.


Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता