मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग लागली, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


आग लागलेली इमारत आनंदनगर परिसरातील सब्जी मार्केटच्या अगदी समोर स्थित आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तात्काळ चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.


आगीमुळे इमारतीतील एक घर जळून खाक झाले, परंतु सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. यावर अधिक तपास सुरू असून, दहिसर पोलीस आणि अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत.


आग लागल्यानंतर, इमारतीच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची लांबच लांब रांग लागली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.

Comments
Add Comment

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या करारांतर्गत ९ जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटन मुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण