कणकवली येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , डॉ. निलेश पाकळे , बापू पारकर , सुशील पारकर , डॉ. अनंत नागवेकर , मालपेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला.
यावेळी ही निवडणूक कणकवलीला विकासाकडे नेणारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवकांना मतदान करा. दुस-या टप्प्यातील विकास करण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द देत विश्वास देण्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे वैयक्तिक गाठीभेटीमध्ये मांडत आहेत.