कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील व्यापारी , डॉक्टर , वकील, पत्रकार , प्रतिष्ठित नागरिक यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे.


कणकवली येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , डॉ. निलेश पाकळे , बापू पारकर , सुशील पारकर , डॉ. अनंत नागवेकर , मालपेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला.


यावेळी ही निवडणूक कणकवलीला विकासाकडे नेणारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवकांना मतदान करा. दुस-या टप्प्यातील विकास करण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द देत विश्वास देण्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे वैयक्तिक गाठीभेटीमध्ये मांडत आहेत.


Comments
Add Comment

संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम

कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला