जन्मदिनी तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, पाच जणांना अटक

मुंबई : वाढदिवस साजरा करताना नवनवे उद्योग करायचे आणि त्याचे व्हिडीओ करुन व्हायरल करायचे हा प्रकार अलिकडे वाढला आहे. ताजी घटना मुंबईतील कुर्ला परिसरातील आहे. कुर्ला येथे जन्मदिनी तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि पाच जणांना अटक केली आहे. ज्या तरुणाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला तो जखमी आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अबुल रेहमान मकसूद आलम खान याचा २४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच मित्रांनी त्याला एकत्रितपणे आमंत्रित केले. केक कापण्याचा कार्यक्रम ठरला. रात्री जिथे वाहनं पार्क असतात अशा निवांत ठिकाणी भेटायचे ठरले. सर्व जण ठरलेल्या जागेवर पोहोचले. यानंतर केक कापण्यात आला. यानंतर शुभेच्छा देण्याऐवजी मित्रांनी वाढदिवस असलेल्या तरुणावर अंडी आणि दगडांचा मारा केला. थोड्या वेळानंतर ज्याचा वाढदिवस होता त्या तरुणावर मित्रांनी पेट्रोल ओतले.


पेट्रोलचा वास येताच अबुल रेहमान मकसूद आलम खान ओरडू लागला. त्याने मित्रांना ओरडतच जाब विचारला. पण मित्रांनी उत्तर दिले नाही. जे पाच जण जमले होते त्यापैकी तीन जणांनी लायटरच्या मदतीने अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. कपड्यांनी पेट घेताच संकटाची जाणीव झाल्यामुळे अबुल रेहमान मकसूद आलम खानने जमिनीवर लोळून आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार बघितला. नेमका तो तरुण अबुल रेहमान मकसूद आलम खान याला ओळखत होता. तो धावत घटनास्थळी आला. यानंतर अबुल रेहमान मकसूद आलम खान याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सीसीटीव्ही फूटेज तपासून अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अबुल रेहमान मकसूद आलम खान याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारात गंभीर जखमी झालेला अबुल रेहमान मकसूद आलम खान याला बरा होण्यासाठी वेळ लागणार आहे.


पोलिसांनी अयाज मलिक, अश्राफ मलिक, कासिम चौधरी, हुझैफा खान आणि शरीफ शेख यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अबुल रेहमान मकसूद आलम खान वर झालेला हल्ला हा पूर्वनियोजीत होता की अचानक झाला होता याचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई :  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट..

उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई  :

रामदास आठवलेंनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

मुंबई : रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये