रेल्वे स्थानकावर भीक मागणाऱ्या मुलीचा शारीरिक सुखासाठी वापर अन् खाडीत आढळला मृतदेह! डोंबिवलीतील धक्कादायक घटना उघड

ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये तीन दिवसांपूर्वी एका मोठ्या सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांमध्ये तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. तरुणीचा प्रियकर श्रीनिवास विश्वकर्माने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.


मृत तरुणी सुरुवातीला रेल्वे प्लेटफॅार्मवर भिक मागायची. मात्र ⁠५ वर्षांपूर्वी श्रीनिवास विश्वकर्मा तिला आपल्या घरी राहण्यासाठी घेवून आला होता. कधी बहीण, कधी मुलगी तर कधी बायको म्हणून श्रीनिवास तिची ओळख लोकांना सांगायचा. ⁠पण तो तिच्यावर सारखे लैंगिक अत्याचार करायचा. हत्या झाली तेव्हा तरुणी ४ महिन्यांची गर्भवती होती. तरीही आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत होता. यावेळी तरुणीने नकार दिल्यामुळे आरोपीने गळा आवळून हत्या केली.




या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पलावा सिटीसमोरील खाडी परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यामध्ये एक व्यक्ती खाडीच्या दिशेने सुटकेस घेऊन जात असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळडायघर पोलिसांनी २४ तासात प्रकरण उघडकीस आणले. ⁠वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या टीमने २४ तासांत आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा याला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक केली आहे.


Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ — उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या प्रभावी कॅरेक्टर पोस्टर्सचे अनावरण

अधिक ताकदवान, अधिक काळोख, अधिक खोल: ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरीस सुरू

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे