कंदमुळांचं कालवण

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


आता महाराष्ट्रात सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे, पचायला सोपे आणि अत्यंत पोषक असे सुरण, रताळे, आळू यांसारखे कंद आजी–आजोबांच्या काळापासून आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.


या पदार्थाची खासियत म्हणजे त्यातील साधेपणा आणि घरगुती चवीत दडलेली पारंपरिक शान. फोडणीचा सुगंध, गुळ–चिंचेची हलकी आंबट–गोड चव, आणि उकडलेल्या कंदमुळांचा मऊसर पोत—हे सगळं मिळून हा पदार्थ थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता देणारा आणि मनाला समाधान देणारा खरा हिवाळी आनंद बनतो. पौष्टिक खाण्याची आणि पारंपरिक चवीची सुंदर सांगड घालणारे हे कालवण म्हणजे आपल्या मातीतल्या पाककलेचा सुगंधी वारसा.
गरमभाकरीसोबत ते अजूनच खुलून येते!


(सुरण, रताळे, आळू – हिवाळी पारंपरिक खास) साहित्य (४ जणांसाठी) :


सुरण - अर्धा कप (उकडून चौकोनी तुकडे)
रताळे - अर्धा कप (उकडून तुकडे)
आळू (अळकुड्या) - अर्धा कप (उकडलेले), कांदा - १ (बारीक चिरलेला)
कढीपत्ता - ७-८ पाने, हिरव्या मिरच्या - २ (चिरलेल्या), लसूण - ५ पाकळ्या (ठेचलेल्या), मोहरी - अर्धा टीस्पून, जिरे -अर्धा टीस्पून, हळद -अर्धा टीस्पून, लाल तिखट - १ टीस्पून, गूळ - १ टीस्पून, चिंच - १ टीस्पून (पाणी काढलेले), दही - अर्धा टेबलस्पून, तेल - २ टेबलस्पून, मीठ - चवीनुसार, कोथिंबीर - २ टेबलस्पून


कृती : सुरण, रताळे आणि आळू तुकडे कापा आणि वेगवेगळे उकडून घ्या. कढईत तेल गरम करा. मोहरी, जिरे टाका. फुटले की कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. आता चिरलेला कांदा घालून किंचित सोनेरी होईपर्यंत परता. आता हळद आणि लाल तिखट घाला. छान परतून त्यात दही घाला. दोन मिनिटाने उकडलेले सुरण-रताळे-आळू तुकडे घाला. हलक्या हाताने मिश्रण परता. अर्धा कप गरम पाणी घाला. गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ टाका. झाकण ठेवून मंद आचेवर ८-१० मिनिटे शिजू द्या.वरून कोथिंबीर घाला. कालवण जरा घट्ट असलं की अगदी परफेक्ट झाले समजावे!


सर्व्हिंग टिप्स : गरम ज्वारी/बाजरी भाकरीसोबत अप्रतिम लागते. बाजूला लसूण ठेचा आणि कांदा–लिंबू दिल्यास चव दुप्पट होते. ताटात सर्व्ह करताना वरून १ टीस्पून तूप टाकले तर उत्तमच. थंडीमध्ये उष्णता देणारी, फायबर, विटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली, उकडलेल्या कंदमुळे पचायला सोपी तुम्ही नक्की करून बघा!

Comments
Add Comment

स्त्रीस्वभाव : कोमलतेत दडलेली भावविश्वाची समृद्धी

निशा वर्तक “स्त्री”हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर अनेक भावना उभ्या राहतात — माया, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा,

नात्यांचे नवीन प्रकार : कारणे आणि परिणाम

मीनाक्षी जगदाळे आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मानवी नातेसंबंधांची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी लग्न

लोलक

आशय : वीणा सानेकर ज्ञानपीठ पारितोषिक विजेते विनोदकुमार शुक्ल यांनी दोनेक महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला.

आज मला हसू कधी आलं?

मनातलं गायत्री डोंगरे खूप वेळा असं होतं…. दिवस संपतो, पण आपण काय अनुभवलं, याचा विचारच होत नाही. काय केलं, काय

स्वातंत्र्याची ऐशी तैशी

आरती रमेश कोचरेकर स्वातंत्र्य मग ते बोलण्याचे असो वा व्यक्त होण्याचे... ते तोंडाचे बोळके झाले तरी लवलवत राहते,

बुडत्याचा पाय खोलात

मीनाक्षी जगदाळे संक कॉस्ट फॅलसी ही मानवी वर्तणुकीशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची मनोवैज्ञानिक संकल्पना आहे.