लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सभेत मतदारांना उद्देशून मोठी घोषणा केली. अयोध्या राममंदिरातील कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत त्यांनी नगरपालिकांवरही भगवा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. “अयोध्येच्या मंदिरावर भगवा फडकला, तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकांवरही फडकला पाहिजे,” असे फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपने प्रत्येक शहराच्या विकासासाठी स्पष्ट आराखडा तयार केला आहे. राज्यातील अनेक गावांवर लक्ष दिले गेले, मात्र शहरांच्या मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने शहरी भाग बकाल झाले आहेत. पारदर्शक आणि जबाबदार कामकाजासाठी भाजपचे उमेदवार पुढे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.



“जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही”


फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य करत महत्त्वाचा संदेश दिला. “निवडणुकांच्या काळात विरोधकांनी पसरवले की सरकार ही योजना थांबवेल. पण माझ्या बहिणींना मी स्पष्ट सांगतो, तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही,” असे त्यांनी आश्वासन दिले.


ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात सरकारने कोणतीही योजना बंद केली नाही; उलट लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, पिकविमा, आणि कृषीविषयक अनेक निर्णय सातत्याने राबवले जात आहेत. “आम्ही फक्त आश्वासनाची राजकारण करणारे नसून लोकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवण्यावर आमचा भर आहे,” असे ते म्हणाले.


अयोध्येतील राममंदिराच्या कळस व धर्मध्वज अनावरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिराचे काम पूर्णत्वास येते तेव्हा कळस बांधला जातो. “आज अयोध्या पूर्ण झाली, आता तुमच्या परिसरात विकासाचा कळस चढवण्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे,” असे ते म्हणाले.


सभेनंतर मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाऊन ११ नगरपरिषदांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराला संबोधित केले.

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)