अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली. दुपारी तीन ते सव्वा सहा दरम्यान मुरुडसाठी एकही बस न सुटल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना तीन साडेतीन तास खोळंबून रहावे लागले. या ताणतणावामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी वाहतूक प्रशासनाच्या या गलथान कारभारावर संतापासह नाराजी व्यक्त केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून सव्वा सहापर्यंत अलिबाग आगारात प्रवाशी बसची वाट पाहत उभे होते, परंतु मुरुडकडे जाणारी एकही बस फलाटावर आली नाही. अनेक प्रवाशांना कामावर, मुलांच्या शाळेत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुरुडला जायचे होते. परंतु बस न सुटल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला असे त्यांनी सांगितले.

मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी याबाबत विचारणा केली असता, 'अलिबाग आगारातून मुरुडला जाणारी बस पाच वाजता सुटली आहे,' असा दावा केला. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि आगारातील परिस्थिती यानुसार बस वेळेवर निघालेली नव्हती. अलिबाग आगारात चौकशी केली असता तेथील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मुरुडकडे जाणाऱ्या बसेस मुख्यतः मुरुड आगारातून निघालेल्या असतात, अलिबाग आगाराची बस या मार्गावर नियमित निघत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर मुरुडला पोहोचण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागते. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावर बस सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

वसईत विषारी वायूची गळती ; १३ जण बाधित

वसई : पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून विषारी वायूची गळती झाली. या वायू गळतीमुळे परिसरातील

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना