Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३ नोव्हेंबर रोजी रविवारी होणारा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणी शनिवारी अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे स्मृतीने विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


या घटनेनंतर पलाश मुच्छल याचे देखील पित्त वाढले आणि व्हायरल इन्फेक्शन झाले. त्यालाही एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर तो हॉटेलवर परतला आहे.


ऐन लग्नाच्यावेळी स्मृतीच्या बाबांची आणि होणाऱ्या नवऱ्याची तब्येत बिघडल्याने घरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी सांगितले की, वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारल्यानंतरच विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. मानधना आणि मुच्छल कुटुंबीयांनी एकत्रितपणे हा निर्णय घेत, चाहत्यांना कोणत्याही अफवा न पसरवण्याची आणि स्मृतीच्या वडिलांच्या लवकर स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.


सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते. आज दुपारी चार वाजता मुख्य विवाह सोहळा पार पडणार होता. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यतादेखील व्यक्त केली गेली होती. मात्र प्रकृतीच्या अडचणींमुळे आजचा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार