लातूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शिउबाठाला मोठा धक्का; ११ उमेदवारांनी घेतली माघार

लातूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गोंधळले आहे. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका लढवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रेणापूर नगरपंचायतीत शिउबाठाला मोठा धक्का बसला आहे.


रेणापूर नगरपंचायतीसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर असताना, ११ उमेदवारांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याचे चित्र समोर आले आहे. यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तसेच नगरसेवक पदासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांनी म्हटले की, पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही आणि निवडणुकीच्या निकट काळात अडथळ्यांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली.


माघार घेतलेल्या उमेदवारांच्या यादीत ललिता बंजारा – नगराध्यक्षपद, अनुसया कोल्हे, महेश व्यवहारे, गोविंद सुरवसे, रेखा शिंदे, रेहानबी कुरेशी, छाया आकनगीरे, राजन हाके, धोंडीराम चव्हाण, शांताबाई चव्हाण, बाबाराव ठावरे यांचा समावेश आहे.


माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या सर्व उमेदवारांना निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश दिले होते. रेणापूर नगरपंचायतीची स्थापना २०१६ मध्ये झाली आणि २०१७ मध्ये पहिली निवडणूक पार पडली. त्या वेळी भाजपची एकहाती सत्ता आली होती. त्यानंतर ३ वर्षे प्रशासकांचा कालावधी राहिला.


यंदा या नगरपंचायतीत भाजप, शिवसेना (दोन्ही गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तगडा मुकाबला होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत माघार घेतलेल्या ११ उमेदवारांच्या कारणास्तव शिउबाठाला भाजपला आव्हान देण्यास थोडा धोका निर्माण झाला आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर ही रणनीती राबवली गेल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे.


इतर नगरपरिषद निवडणुकीतील अर्जांची संख्या:


उदगीर : नगराध्यक्ष – ८, सदस्य – २०५


निलंगा : नगराध्यक्ष – ७, सदस्य – ८८


औसा : नगराध्यक्ष – ८, सदस्य – ७८


अहमदपूर : नगराध्यक्ष – ११, सदस्य – १४९


रेणापूर : नगराध्यक्ष – १०, सदस्य – ९४


लातूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ४४ तर सदस्य पदासाठी ६१४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राजकीय खेळी आणि उमेदवारांच्या माघारीमुळे रेणापूर नगरपंचायतीत चौरंगी लढत अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा