डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या मूळगावी सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला. गौरीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली होती.


प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गौरीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, गौरींच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करत संपूर्ण तपासाची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


सोमवारी गौरीचे पार्थिव त्यांच्या मूळगाव मोहोज-देवढे (अहिल्यानगर) येथे आणण्यात आले. यावेळी पालवे कुटुंबीयांनी गौरींचे अंत्यसंस्कार अनंत गर्जे यांच्या घरासमोरच करावेत, असा आग्रह धरला. या मागणीवरून गर्जे आणि पालवे कुटुंबीयांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद शांत केला.


यानंतर अखेर अनंत गर्जेच्या घराशेजारीच डॉ. गौरीच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


अंत्यसंस्कारादरम्यान गौरींचे वडील पोलिसांपुढे रडत रडत म्हणाले, “तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका.” हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.


सुरुवातीला पालवे कुटुंबीयांनी अनंत गर्जेला अटक झाल्याची माहिती मिळाली नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. पोलिसांनी माहिती देत त्यांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले.


रविवारी रात्री १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली. गर्जे, त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. आज अनंत गर्जेला न्यायालयात हजर केले जाणार आहे.


काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक, डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह, अनंत गर्जे यांच्या वरळीतील घराची झाडाझडती घेण्यासाठी पोहचले आहे. तपासादरम्यान महत्त्वाचा पुरावा सापडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा