मुंबई महापालिकेतील आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के…

८५ हरकती सादर, लवकरच निवडणूक होणार


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडल्यामुळे वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई महापालिकेत आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होणारच असे चित्र आहे. आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यासाठी दिलेल्या कालावधीत ८५ तक्रारी मुंबई महापालिकेकडे सादर झाल्या आहेत.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारने १५९ ठिकाणी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली. यामुळे निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. मात्र मुंबई महापालिकेचा विचार करता या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आतच असून २२७ पैकी ३४.३६ टक्के प्रभाग आरक्षित आहेत.


मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांपैकी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के प्रमाणे ६१ जागा आरक्षित आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींसाठी १५ जागा व अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित आहेत.


काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव


आरक्षण सोडतीत भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) या पक्षांतील ज्येष्ठ व अनुभवी माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर काही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. दहिसर, बोरिवली, वरळी यासारख्या काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत, तर मानखुर्द, शिवाजी नगरमध्ये सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई