मुंबई महापालिकेतील आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के…

८५ हरकती सादर, लवकरच निवडणूक होणार


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडल्यामुळे वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई महापालिकेत आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होणारच असे चित्र आहे. आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यासाठी दिलेल्या कालावधीत ८५ तक्रारी मुंबई महापालिकेकडे सादर झाल्या आहेत.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारने १५९ ठिकाणी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली. यामुळे निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. मात्र मुंबई महापालिकेचा विचार करता या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आतच असून २२७ पैकी ३४.३६ टक्के प्रभाग आरक्षित आहेत.


मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांपैकी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के प्रमाणे ६१ जागा आरक्षित आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींसाठी १५ जागा व अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित आहेत.


काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव


आरक्षण सोडतीत भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) या पक्षांतील ज्येष्ठ व अनुभवी माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर काही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. दहिसर, बोरिवली, वरळी यासारख्या काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत, तर मानखुर्द, शिवाजी नगरमध्ये सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील