‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. २०२७ साठीचा सन्मान पुण्याला मिळण्याची आशा आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वासापूजन करून महोत्सवाच्या मांडव उभारणीला सुरुवात करण्यात आली. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, बागेश्री मंठाळकर, या वेळी उपस्थित होते.


पाटील म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे आता तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत पुणेकर या महोत्सवाशी जोडले गेले आहेत. ‘युनेस्को’च्या २०२७च्या जागतिक पुस्तक राजधानी सन्मानासाठी पुण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांचेही अर्ज असतात. त्यामुळे कोणत्या स्थळाला पुस्तक राजधानीचा मान मिळणार, त्याची घोषणा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. या घोषणेच्या अानुषंगाने यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाची युनेस्कोच्या समितीकडून पाहणी होणार आहे. यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव आणखी व्यापक होणार आहे.’


डुडी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जयपूरला छोट्या स्तरावर सुरू झालेला साहित्य महोत्सव मोठा होत गेला. त्यातून तेथील पर्यटन, संस्कृतीसह अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘युनेस्को’च्या जागतिक पुस्तक राजधानी या सन्मानासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. ४५० किलोमीटरची ही स्पर्धा चार दिवसांत होणार आहे. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराला ‘ग्लोबल सिटी’ म्हणून ओळख मिळणार आहे.


Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर