पंकजा मुंडेंचे दौरे रद्द; PA च्या पत्नीची आत्महत्या, नातलगांचा हत्येचा आरोप

मुंबई : वरळीत प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने प्रवीणने हत्या केली. काही महिन्यांनतर प्रवीण महाजन ब्रेन हॅमरेजमुळे कोमात गेला. कोमातच काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यानंतर काही वर्षांनी प्रमोद महाजन यांचे मित्र आणि नातलग असलेले गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेला काही वर्षे होत नाहीत तोच गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली.


भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली. गर्जे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाला वर्ष पण झाले नव्हते तोच पत्नीने आत्महत्या केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या घरच्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून कारवाईची मागणी केली आहे.


अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती - पत्नी यांच्यात वाद होऊ लागले. वादाचे प्रमाण वाढत गेले. अखेर गौरीने शनिवारी टोकाचे पाऊल उचलले. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.


लग्नाआधी गौरी या वरळीच्याच बीडीडी चाळीत वास्तव्यास होत्या आणि केईएममध्ये डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या. लग्नानंतर अनंत गर्जे आणि गौरी यांच्यातील संबंध अवघ्या काही महिन्यांत बिघडले आणि गौरीने शनिवारी आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. सध्या पंकजा मुंडे मुंबईतच वास्तव्यास आहेत. पण त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलणे टाळले आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला मदत होईल, एवढीच मोघम प्रतिक्रिया दिली आहे.


आत्महत्येचे नेमके कारण काय ?


अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. लग्नाला दहा महिने होत नाहीत तोच गौरी यांनी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. अद्याप पोलिसांनी या संदर्भात भाष्य केलेले नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.