पंकजा मुंडेंचे दौरे रद्द; PA च्या पत्नीची आत्महत्या, नातलगांचा हत्येचा आरोप

मुंबई : वरळीत प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने प्रवीणने हत्या केली. काही महिन्यांनतर प्रवीण महाजन ब्रेन हॅमरेजमुळे कोमात गेला. कोमातच काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यानंतर काही वर्षांनी प्रमोद महाजन यांचे मित्र आणि नातलग असलेले गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेला काही वर्षे होत नाहीत तोच गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केली.


भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली. गर्जे यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाला वर्ष पण झाले नव्हते तोच पत्नीने आत्महत्या केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या घरच्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून कारवाईची मागणी केली आहे.


अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती - पत्नी यांच्यात वाद होऊ लागले. वादाचे प्रमाण वाढत गेले. अखेर गौरीने शनिवारी टोकाचे पाऊल उचलले. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे.


लग्नाआधी गौरी या वरळीच्याच बीडीडी चाळीत वास्तव्यास होत्या आणि केईएममध्ये डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या. लग्नानंतर अनंत गर्जे आणि गौरी यांच्यातील संबंध अवघ्या काही महिन्यांत बिघडले आणि गौरीने शनिवारी आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. सध्या पंकजा मुंडे मुंबईतच वास्तव्यास आहेत. पण त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलणे टाळले आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाला मदत होईल, एवढीच मोघम प्रतिक्रिया दिली आहे.


आत्महत्येचे नेमके कारण काय ?


अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. लग्नाला दहा महिने होत नाहीत तोच गौरी यांनी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. अद्याप पोलिसांनी या संदर्भात भाष्य केलेले नाही. तपास सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नागपूरला मिळणार आधुनिक मासळी बाजार- मुख्यमंत्र्यांनी मानले मंत्री नितेश राणेंचे आभार; नाथूबाबा यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार

नागपूर : "प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे

'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - हाऊसिंग फॉर ऑल’ योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; दहिसर आणि जुहूतील रडारचे स्थलांतर होणार

नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट होणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे; १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार

नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे

मत्स्यव्यवसाय संस्थांच्या नोंदणीला स्थगिती - मंत्री नितेश राणेंची नागपुरात मोठी घोषणा; मच्छीमार बांधवांच्या वतीने भव्य सत्कार

नागपूर : राज्यातील भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी दि. १२ मे २०२३ च्या शासन निर्णयाला

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल