परभणीत राजकीय राडा; पाथरीत दगडफेक आणि तलवारीने हल्ले

परभणी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्तरावर प्रचाराला जोरदार रंग चढला असून अनेक नेते आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी हालचाली सुरू असताना, काही भागांत मात्र संघर्षाची शक्यता वाढत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात प्रचारादरम्यान झालेल्या हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे.


दगडफेक, तलवारी आणि चाकूंसह हल्ले


पाथरी तालुक्यात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत वाद चिघळला. अल्पावधीतच परिस्थिती ताणली गेली आणि वाद थेट हिंसक स्वरुपात बदलला. घटनेदरम्यान तलवारी आणि चाकूंसह हल्ले झाल्याची माहिती मिळाली असून दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत. दगडफेक आणि धारदार शस्त्रांच्या हल्ल्यांमुळे काहींना डोक्यावर टाके घालावे लागले आहेत. जखमींना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत वातावरण आणखी तापवले आहे.


हर्षवर्धन सपकाळ यांना काळे झेंडे


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पाथरीत प्रचारासाठी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांना काळे झेंडे दाखवले. नंतर सेलू शहरातही सपकाळ यांच्या आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत देवेंद्र फडणवीस झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या

बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे कारवाईचे आदेश

मुंबई : सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक ठोस पाऊल उचलले आहे.

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला