१७ ठिकाणी दुरंगी लढत, चार ठिकाणी तिरंगी सामना

कर्जत : शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर कर्जत नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या सतरा ठिकाणी दुरंगी लढत तर चार अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी निवणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस - उबाठा परिवर्तन आघाडीच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना - आरपीआय महायुतीच्या डॉ. स्वाती अक्षय लाड यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.


प्रभाग एक ‘अ’मध्ये जयदीप कृष्णा पाटील अपक्ष उमेदवारी लढवीत असल्याने तेथे तिरंगी लढत तर प्रभाग एक ‘ब’मध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग दोन अ आणि ब, प्रभाग तीन अ आणि ब, प्रभाग चार अ आणि ब आणि प्रभाग पाच ‘अ’ मध्ये एकास एक उमेदवार असल्याने सरळ लढत तर प्रभाग पाच ‘ब’ मध्ये उमेश अर्जुन शेलार हे अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा अ आणि ब, प्रभाग सात अ आणि ब, प्रभाग आठ अ आणि ब मध्ये सरळ लढत आहे. प्रभाग नऊ अ मध्ये राजेश पिराजी साळुंखे अपक्ष निवडणूक लढवीत असल्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग नऊ ‘ब’मध्ये दुरंगी लढत आहे. प्रभाग दहा ‘अ’ आणि ‘क’ मध्ये दुरंगी लढत होणार आहे, तर प्रभाग दहा ‘ब’मध्ये नितेश राजेंद्र बाचल अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत पाहायला मिळेल.


या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षासह काही प्रभागात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने ते निवडणुकीतून बाहेर पडले. या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रभाग सहा ‘ब’मधील उमेदवार प्रशांत वसंत पाटील यांनी नामनिर्देशन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दाखल केले मात्र ए बी फॉर्म उबाठा शिवसेनेचा दिल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सुद्धा अर्ज दाखल केल्याने ते निवडणूक रिंगणात राहिले. ते कर्जत परिवर्तन विकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना २६ नोव्हेंबर रोजी निशाणी मिळणार असल्याने ते सध्या निशाणी विना प्रचार करीत असून त्यांनी रिक्षा निशाणी मागितली आहे. अन्य चार अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावीत असले तरी त्यांना मिळणाऱ्या मतांमुळे अटीतटीच्या लढतीत एखाद्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या