१७ ठिकाणी दुरंगी लढत, चार ठिकाणी तिरंगी सामना

कर्जत : शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर कर्जत नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या सतरा ठिकाणी दुरंगी लढत तर चार अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी निवणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस - उबाठा परिवर्तन आघाडीच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना - आरपीआय महायुतीच्या डॉ. स्वाती अक्षय लाड यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.


प्रभाग एक ‘अ’मध्ये जयदीप कृष्णा पाटील अपक्ष उमेदवारी लढवीत असल्याने तेथे तिरंगी लढत तर प्रभाग एक ‘ब’मध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग दोन अ आणि ब, प्रभाग तीन अ आणि ब, प्रभाग चार अ आणि ब आणि प्रभाग पाच ‘अ’ मध्ये एकास एक उमेदवार असल्याने सरळ लढत तर प्रभाग पाच ‘ब’ मध्ये उमेश अर्जुन शेलार हे अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा अ आणि ब, प्रभाग सात अ आणि ब, प्रभाग आठ अ आणि ब मध्ये सरळ लढत आहे. प्रभाग नऊ अ मध्ये राजेश पिराजी साळुंखे अपक्ष निवडणूक लढवीत असल्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग नऊ ‘ब’मध्ये दुरंगी लढत आहे. प्रभाग दहा ‘अ’ आणि ‘क’ मध्ये दुरंगी लढत होणार आहे, तर प्रभाग दहा ‘ब’मध्ये नितेश राजेंद्र बाचल अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत पाहायला मिळेल.


या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षासह काही प्रभागात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने ते निवडणुकीतून बाहेर पडले. या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रभाग सहा ‘ब’मधील उमेदवार प्रशांत वसंत पाटील यांनी नामनिर्देशन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दाखल केले मात्र ए बी फॉर्म उबाठा शिवसेनेचा दिल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सुद्धा अर्ज दाखल केल्याने ते निवडणूक रिंगणात राहिले. ते कर्जत परिवर्तन विकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना २६ नोव्हेंबर रोजी निशाणी मिळणार असल्याने ते सध्या निशाणी विना प्रचार करीत असून त्यांनी रिक्षा निशाणी मागितली आहे. अन्य चार अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावीत असले तरी त्यांना मिळणाऱ्या मतांमुळे अटीतटीच्या लढतीत एखाद्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित