अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या भागातच काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे एक कार्यालय आहे. भाजप युवा मोर्चाने घोषणाबाजी सुरू करताच काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर आले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तसेच घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला.


अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपकडून सर्वात आधी ही मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही लोढांना या मागणीसाठी पाठिंबा जाहीर केला. अखेर या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय धुमश्चक्री रंगण्यास सुरुवात झाली. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, असेही अस्लम शेख म्हणाले होते. आता या घडामोडींवरुन मालवणीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढू लागला आहे.


अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या काही आंदोलकांना ताब्यात घेत मालवणी पोलीस ठाण्यात आणलं होतं. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी काही नेते पोलीस ठाण्यात आले होते. याच दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू झालं.



प्रकरण नेमके आहे तरी काय ?


मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अस्लम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप करत भाजपकडून अस्लम शेख यांच्यावर टीका केली जात होती. यातूनच अमित साटम यांनी खोचक शब्दांत अस्लम शेख यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी येथे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

Comments
Add Comment

Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा

Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात

Legal notice served to Amazon : महान गणितज्ञ ‘आर्यभट्ट’ यांच्या विडंबन प्रकरणी ॲमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस!

मुंबई : प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ 'आर्यभट्ट' यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन

Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघाची घोषणा, सिंधू करणार नेतृत्व

नवी दिल्ली : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि विद्यमान पुरुष दुहेरीचे विजेते सात्विकसाईराज

Parul Chaudhary : पारुल चौधरीने फ्रान्समध्ये ५,००० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडला

पॅरिस : भारताच्या पारुल चौधरीने फ्रान्समधील नाईस येथे झालेल्या 'मीटिंग निकया २०२६' मध्ये महिलांच्या ५,००० मीटर

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून