अस्लम शेख प्रकरण चिघळले, मालाडच्या मालवणीत भाजप युवा मोर्चा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे अग्निशामक दलाच्या कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या भागातच काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे एक कार्यालय आहे. भाजप युवा मोर्चाने घोषणाबाजी सुरू करताच काँग्रेस कार्यकर्तेही रस्त्यावर आले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तसेच घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला.


अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपकडून सर्वात आधी ही मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही लोढांना या मागणीसाठी पाठिंबा जाहीर केला. अखेर या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय धुमश्चक्री रंगण्यास सुरुवात झाली. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, असेही अस्लम शेख म्हणाले होते. आता या घडामोडींवरुन मालवणीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढू लागला आहे.


अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या काही आंदोलकांना ताब्यात घेत मालवणी पोलीस ठाण्यात आणलं होतं. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी काही नेते पोलीस ठाण्यात आले होते. याच दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू झालं.



प्रकरण नेमके आहे तरी काय ?


मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मुंबई भाजप आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अस्लम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप करत भाजपकडून अस्लम शेख यांच्यावर टीका केली जात होती. यातूनच अमित साटम यांनी खोचक शब्दांत अस्लम शेख यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी येथे अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.

Comments
Add Comment

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’