मुंबईत राडा, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते अस्लम शेख आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी तसेच अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशीही मागणी अमित साटम यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज म्हणजेच शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी राडा झाला.


अंधेरी पश्चिम येथील अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा नेला होता. यावेळी अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसचा आक्रमक पवित्रा बघून भाजपचे कार्यकर्तेही पुढे सरसावले आणि त्यांनी अमित साटम आणि त्यांच्या ऑफिसला काहीही होऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी आवश्यक हालचाली केल्या. या दरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा आल्यामुळे तणाव वाढेल ही शक्यता गृहित धरुन पुरेशी खबरदारी घेतली होती. अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करुन बंदोबस्त ठेवला होता. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.


काय म्हणाले अमित साटम ?


"अस्लम शेख यांना सांगू इच्छितो, आपल्या सारख्या पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबात भीक घालत नाहीत. तुम्ही मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅर्टन चालवेला आहे तो उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. येणाऱ्या काळात तुमच्यासारखी हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप आणि वल्गना कदापी करु नये. कायद्याच्याआधीन राहून तुमच्यावर कारवाई होईल", असं अमित साटम म्हणाले होते.

Comments
Add Comment

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’